मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दळण

एकदा बायकोचं आणि माझं दळण आणणे; या कामावरून जबरदस्त वाजलं.. चांगली खडाजंगी झाली. आता माझा जन्म काय दळण आणण्यासाठी थोडीचं झालाय राव?. पण शेवटी मी पडलो आपला 'दीन-अगतिक, गरीब बिचारे नवरे संघटनेचा अध्यक्ष' गपगुमान जावून दळण आणावे लागले....दळण घेऊन तर गेलो पण तिथे विचार करू लागलो.....मनात म्हंटल अशी हार मानून चालणार नाही...एवढ्या वेगवेगळ्या संघटनेचे आपण अध्यक्ष आणि असं कच खावून कसं चालेल.... दळण सुरू असताना जरा आजूबाजूला नजर गेली आणि लगेच डोक्यात भन्नाट आयडिया आली....डोक्यात किडा वळवळायला लागला...अन चेहराच खुलला....प्रसन्न मनानं हसरा चेहरा घेऊन दळण घेऊन घरी गेलो...माझं हास्यवदन पाहून ती जरा गोंधळात पडली...मघाशी तणतणत गेलेलं शिंगरू असं हरणाच्या पाडसासारखं बागडत घरी आल्यावर तिच्या कपाळावर साडेबावीस आठ्या पडल्या.... काही दिवस गेले आणि मी मग स्वतःहून तिला विचारले ' अरे पिठं संपलं नाही का अजून दळण कधी आणायचं?'....तिला वाटलं नवरा ताळ्यावर आला....डबा घेऊन मी दळण आणायला गेलो...यावेळी मात्र जरा उत्साहाने गेलो...बायको बुचकळ्यात पडली... हाच उत्साह मी अजून एक दोन वेळा दाखवला....

चुल

चुल बघीतली की लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात. थंडी असो वा कोणताही ऋतु , सकाळी अंथरूणातून उठून पहीले कुठे जात असू तर चुलीकडे. आई भाकरी करत असेल तर , भाकरी थापण्याचा आवाज, घावणे करत असेल तर एक वेगळाच आवाज. हा आवाज येणे कधी बंद नाही झाले. अविरतपणे चालूच राहीला. आज 'किचन' मध्ये मात्र ती गंमत येत नाही. आग पेटवायला तेवढा वेळ लागत नाही. मला आठवते आम्ही भावंडे बाबांसोबत बसून धगाचा आनंद घेत असू. मी तर मोक्याची जागा पकडण्यासाठी लवकर उठायचो. पण अगोदर बाबाच चुलीजवळ बसलेले असायचे. आईच्या चार पाच भाकऱ्या झालेल्या असायच्या. वायलावर पाणी गरम असायचे. चुल स्वच्छ झाडलेली असायची. सणासुदीला तर चुलीला गिलावा (कलर)  दिला जायचा. त्या गिलाव्याचा गंध अजूनही आठवतो. चुलीच्या बाजूला लाकडांचा ढिग आणि त्यावर बसलेली मांजरे मी चुलीकडे गेलो की धावत येवून टूरटूरत मांडीवर बसायची. चुली जवळची फुकणी आग रूसली की फुंकर घालून रूसलेल्या आगीला हसवायची. पाटणावरच्या काडेपेटेची जागा कधी कोणी घेतली नाही. चुलीची एका बाजूची खोलगट चौकोनी जागा पक्की असायची. चुलीवरचा उतव पण कधी मातला नाही.        चुलीवरच्या जेवन...

तृष्णा

तृष्णा                        =======      एक व्यापारी था, वह ट्रक में चावल के बोरे लिए जा रहा था। एक बोरा खिसक कर गिर गया। कुछ चीटियां आयीं 10-20 दाने ले गयीं, कुछ चूहे आये 100-50 ग्राम खाये और चले गये, कुछ पक्षी आये थोड़ा खाकर उड़ गये, कुछ गायें आयीं 2-3 किलो खाकर चली गयीं, एक मनुष्य आया और वह पूरा बोरा ही उठा ले गया।         अन्य प्राणी पेट के लिए जीते हैं, लेकिन मनुष्य तृष्णा में जीता है। इसीलिए इसके पास सब कुछ होते हुए भी यह सर्वाधिक दुखी है।         आवश्यकता के बाद इच्छा को रोकें, अन्यथा यह अनियंत्रित बढ़ती ही जायेगी, और दुख का कारण बनेगी।✍🏻  चौराहे पर खड़ी जिंदगी, नजरें दौड़ाती हैं... 👀 काश कोई बोर्ड दिख जाए जिस पर लिखा हो... ✍🏻😌🙏🏻                       "सुकून..                      0. कि.मी."

globalisation

Just Really superb example well written Question : What is the truest definition of Globalization ? Answer : Princess Diana's death. Question : How come ? Answer : An English princess with an Egyptian boyfriend crashes in a French tunnel, driving a German car with a Dutch engine, driven by a Belgian who was drunk on Scottish whisky, followed closely by Italian Paparazzis on Japanese motorcycles, treated by an American doctor, using Brazilian medicines And moreover this is sent to you by an Indian using American technology, and you're probably reading this on your iPhone or Android or Windows phone or blackberry, that use Taiwanese chips and a Korean screen, assembled by Bangladeshi workers in a Singapore plant, transported by Pakistani lorry-drivers....  That is Globalisation!!! 🤔🤔🤔🤔

masale bhat

मसालेभात असं समजा की तुम्हाला एका लग्नाचं बोलावणं आलं, वधू वराच्या डोक्यावर अक्षता टाकून तुम्ही तडक जेवणाच्या हॉल कडे वळता. तिथे तुमच्या सारख्या चतुर लोकांची आधीच  गर्दी उडालेली असते. गर्दीतून वाट काढून तुम्ही एका बाजूला सरकता आणि तुम्हाला दिसतात ओळीत मांडलेली पानं आणि त्यात उरलेल्या दोन रिकाम्या खुर्च्या.!!!  तुम्ही पटकन त्यातली एक खुर्ची पकडता आणि स्वतःवरच खुश होत वाढप्यांची वाट बघता. पानं वाढायला सुरुवात होते, मस्तपैकी बासुंदी, पुरीचा बेत असतो. तुम्हालाही सडकून भूक लागलेली असते, म्हणून बासुंदी वर आडवा हात मारायचे मनसुबे तुम्ही रचता. पण पुरीवाला वाढायला येतो तेव्हा फेरारी च्या वेगाने "पुरी... पुरी... पुरी... पुरी...." असं म्हणत तुम्ही "हो, चार" असं म्हणेपर्यंत दहा पानं पुढे पोहोचलेला असतो.  जेमतेम एकदा त्याच्या भांड्यात उरलेल्या दोन पुऱ्या मिळवल्यावर तर तो बेपत्ताच होतो. त्याची वाट बघत तुम्ही आपलं बाकीचे पदार्थ संपवण्याच्या मागे लागता. शेवटी बराच वेळ वाट बघूनही तो येत नाही म्हणून तुम्ही मसाले भात वाढणाऱ्याला "हो" म्हणता. यजमानांनी दिलेल्या...

kerala flood

अंटार्क्टिकाचा बर्फ केरळात कोसळला.. सावधान.    केरळमधील अतिवृष्टी व महापूरात शेकडो माणसे बळी गेली. आता पाणी ओसरत आहे. माणसांची सुटका करण्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. हानीचे प्रमाण समजत आहे. यात पैशाचा आकडा दिसत राहतो. सुमारे २० ०००  कोटी रूपयांचा आकडा सरकारला वाटतो. केरळात १०० वर्षांतला मोठा पाऊस पडला असे म्हटले जाते. मुंबईतील २६ जुलैच्या पावसाबाबतही असेच म्हटले गेले. यात चूक होत आहे. यामुळे परिस्थितीचे गांभीर्य नागरिकांच्या लक्षात येत नाही. वस्तुस्थिती ही आहे की, पावसाची नोंद ठेवण्यासच देशातील विविध भागांत पन्नास साठ ते शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी सुरूवात झाली. मात्र, पाऊस तर कोट्यावधी वर्षे पडत आहे. केरळ, मुंबई किंवा जगात सध्या हाहाकार घडवणारा पाऊस हजारो, लाखो वा कोट्यावधी वर्षांतील, न पडणारा पाऊस आहे. कारण सध्या पृथ्वीच्या तापमानात होत असलेल्या महाविस्फोटक वाढीशी त्याचा संबंध आहे. अशा वेगात होणारी वाढ कोट्यावधी वर्षांत झालेली नाही. अंटार्क्टिकाचे बर्फसाठे केरळात कोसळले आहेत. हजारो वर्षे अंटार्क्टिकाचे, दक्षिण ध्रुवाचे तापमान वर्षातील बहुतांश काळ शून्याखाली ...