मुख्य सामग्रीवर वगळा

चुल

चुल बघीतली की लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात. थंडी असो वा कोणताही ऋतु , सकाळी अंथरूणातून उठून पहीले कुठे जात असू तर चुलीकडे. आई भाकरी करत असेल तर , भाकरी थापण्याचा आवाज, घावणे करत असेल तर एक वेगळाच आवाज. हा आवाज येणे कधी बंद नाही झाले. अविरतपणे चालूच राहीला. आज 'किचन' मध्ये मात्र ती गंमत येत नाही. आग पेटवायला तेवढा वेळ लागत नाही. मला आठवते आम्ही भावंडे बाबांसोबत बसून धगाचा आनंद घेत असू. मी तर मोक्याची जागा पकडण्यासाठी लवकर उठायचो. पण अगोदर बाबाच चुलीजवळ बसलेले असायचे. आईच्या चार पाच भाकऱ्या झालेल्या असायच्या. वायलावर पाणी गरम असायचे. चुल स्वच्छ झाडलेली असायची. सणासुदीला तर चुलीला गिलावा (कलर)  दिला जायचा. त्या गिलाव्याचा गंध अजूनही आठवतो. चुलीच्या बाजूला लाकडांचा ढिग आणि त्यावर बसलेली मांजरे मी चुलीकडे गेलो की धावत येवून टूरटूरत मांडीवर बसायची. चुली जवळची फुकणी आग रूसली की फुंकर घालून रूसलेल्या आगीला हसवायची. पाटणावरच्या काडेपेटेची जागा कधी कोणी घेतली नाही. चुलीची एका बाजूची खोलगट चौकोनी जागा पक्की असायची. चुलीवरचा उतव पण कधी मातला नाही.
       चुलीवरच्या जेवनाची चव काही औरच असायची. आजही चुलीबरोबर केलेल्या गोष्टी आठवल्या की परत गावी जावेसे वाटते. चुलीत भाजलेली सुखी मच्छी, करपूस भाजलेले.कोंबडीचे पाय किंवा आईने मुंबरात भाजलेले वाटनासाठी असलेले कांदा खोबरे असेल. खोकला झाला असेल तर कोरफडीची पात याच चुलीच्या मुंबरात भाजली गेलीय. धुप जाळण्यासाठी निखारे चुलीनेच दिलेत. म्हणूनच चुलीला आजही आपल्याकडे देवतेचा दर्जा आहे. आजही चुलीला पाय लागला तर नमस्कार केला जातो. सणासुदीला पुजा करून नैवेद्य दाखवला जातो. आज लोक परत जुण्याकडे वळली आहेत . चुलीवरच्या जेवनाचा आग्रह धरू लागलीत. नव्या गोष्टी आपल्याशा करताना जुन्याना विसरता कामा नये. काळासोबत चालण्याच्या नादात कुठेतरी खरे जगणे विसरले जातेय.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

💐💐 तीन गाळण्या 🍀🍀 सौक्रेटीस हा एक महान ग्रीक तत्ववेत्ता होता . एके दिवशी त्याच्याकडे एकजण आला व त्याला सांगू लागला ,  " अहो ....तुमच्या मित्राबद्दल मी आताच काय ऐकले ? तुम्हास म...
माणूस कशासाठी जगतो तेच विसरला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी काय लागते? परंतु माणसाची राक्षसी महत्वाकांक्षा त्याला जन्मभर स्वताचा नोकर करून ठेवते. पैसा आणि सत्ता मिळविण्यासाठी तो आयुष्यभर गुलामीत दिवस काढतो, आणि मरताना त्याला प्रचंड वेदना होतात. आपण कमावलेले सर्व काही इथेच सोडून जाताना त्याला आपल्या कर्माचे अत्यंत वाईट वाटते. कष्ट करणारा माणूस मंदिरात फार तर डोके टेकवून दर्शन घेतो, ५/१० रुपये पेटीत दान करतो, परंतु तो किलोचे किंवा मनाचे सिंहासन देवू शकत नाही, मात्र भल्या बुर्या मार्गाने कमावलेला पैसा पाचवा यासाठी अनेक लोक देवाला आपल्या दुष्टकार्मात सहभागी होण्यासाठी असे दान करतात,  
इस मैसेज को गौर से दो बार पढे ! जिस दिन हमारी मोत होती है, हमारा पैसा बैंक में ही रहा जाता है। * जब हम जिंदा होते हैं तो हमें लगता है कि हमारे पास खच॔ करने को पया॔प्त धन नहीं है। * जब ...