जीवन जेव्हा हळू होते तेव्हा माणूस माणसाला ओळखत होता , परंतु आता जीवन खूपच व्यस्त झाले आहे, माणूस माणसाला ओळखत नाही, तो आता फक्त पैश्याला ओळखतो, आणि पैश्याच्या जोरावर माणसे विकत घेतो . परंतु तो हे विसरतो कि, पैसा हा कधीही तुमच्या कामाला येऊ शकत नाही, जितका माणूस कामाला येतो. आपला शब्द झेलणारे माणसे हि पैश्याच्या जोरावर विकत घेतलेल्या गुंडा पुंडा पेक्षा केव्हाही जास्त मोलाची असतात.