प्रत्येक गोष्टीची शास्त्रीय मीमांसा करून मगच ती गोष्ट करावी. सध्या मात्र सगळीकडे अंधानुकरण करण्याकडे माणसाचा कल आहे असे दिसून येते. यासंदर्भात एक गोष्ट आहे.
एकदा एका आश्रमात एक महाराज होते. त्यांचे अनेक शिष्य तेथे विद्यार्जन करण्यासाठी तेथे राहत असत. महाराजांनि एक मांजर पाळलेली होती. ती मांजर आरती चालू असताना खूपच त्रास देत असे. म्हणून एकदा महाराजांनी एका शिष्याला आरतीच्या आधी ती मांजर बांधून ठेवायला सांगितली. महाराजांच्या आज्ञेवरून शिष्याने ती मांजर बांधून ठेवली आणि आरती झाल्यावर तिला सोडून दिले. झाले, तेंव्हापासून आरती करण्याआधी मांजर बांधायची प्रथा चालू झाली . कालांतराने महाराजांचे निधन झाले पण आरती पूर्वी मांजर बांधायची प्रथा चालूच, कालांतराने त्या मांजराचे निधन झाले, आता मात्र प्रश्न पडला, कारण महाराजांनी सांगितले कि आरतीपूर्वी मांजर बांधा . म्हणून नवीन मांजर बाजारातून विकत आणण्यात आली आणि ती बांधून मग आरती करण्यात आली.
अशा तर्हेने आपण अनेक गोष्टी केवळ काहीही तर्क नसताना करत असतो मात्र शास्त्रीय विचार करण्याची आपली
क्षमता आपण घालवून बसलो आहोत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा