नितीमत्ता अनीतीने हजारो रुपये कमावणाऱ्या पेक्षा नीतीने अर्धपोटी राहणारा जास्त सुखी असतो, परंतु आपल्या समाजात कोणी किती पैसा कमावला याला जास्त महत्व आहे. नीतिवान मनुष्य केवळ स्वताचे पोट भरतो परंतु अनितीवान मनुष्य आपल्या सात पिढ्यांचे पैसे कमावतो आणि तेही इतरांचे वाईट करून. तेंव्हा विचार करा कि आपण दुसर्यांचे जेवण ओरबाडून तर खात नाही ना ! आज प्रत्येक जन आपल्या तटावर तूप वाढून घ्यायला बघत आहे, परंतु दुसर्याच्या ताटात शिळी भाकरी आहे कि नाही याचे कोणालाही भान नाही.