प्रत्येक प्राणीमात्र आपल्या कोशामध्ये आनंदी असतो. आपले वागणे हे प्रत्येकाला चांगले आहे असे वाटते, परंतु जेव्हा इतर लोक तुम्हाला चांगले म्हणतील तेव्हाच आपण चांगले आहोत असे समजावे. मेल्यानंतर माणूस स्वर्गात गेला कि नरकात हे कसे ओळखावे? जर मेल्यानंतर लोक तुमच्याबद्दल चांगले बोलले तर तुम्ही स्वर्गात गेलात असे समजावे, आणि लोकांनी निंदा केली तर तुम्ही नरकात गेलात असे समजावे.
माणूस कशासाठी जगतो तेच विसरला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी काय लागते? परंतु माणसाची राक्षसी महत्वाकांक्षा त्याला जन्मभर स्वताचा नोकर करून ठेवते. पैसा आणि सत्ता मिळविण्यासाठी तो आयुष्यभर गुलामीत दिवस काढतो, आणि मरताना त्याला प्रचंड वेदना होतात. आपण कमावलेले सर्व काही इथेच सोडून जाताना त्याला आपल्या कर्माचे अत्यंत वाईट वाटते. कष्ट करणारा माणूस मंदिरात फार तर डोके टेकवून दर्शन घेतो, ५/१० रुपये पेटीत दान करतो, परंतु तो किलोचे किंवा मनाचे सिंहासन देवू शकत नाही, मात्र भल्या बुर्या मार्गाने कमावलेला पैसा पाचवा यासाठी अनेक लोक देवाला आपल्या दुष्टकार्मात सहभागी होण्यासाठी असे दान करतात,

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा