मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सोशल मीडिया

Social media आणि instant messaging app यांनी सर्वसामान्य माणसांच्या जीवनात वेगळेच स्थान प्राप्त केले आहे.  माझ्या मागील लेखात मी याच्या वापराबद्दल भरपूर लिहिले होते परंतु आज या माध्यमांच्या वापरापेक्षा त्यावरील पोस्ट ची सत्यता आणि पोस्टवरील प्रतिक्रिया यावर लिहावे असे प्रकर्षाने जाणवले म्हणून हा लेखन प्रपंच. माकडाच्या हाती कोलीत अशी काहीशी या माध्यमांची अवस्था आहे, कोणीही उठावे काहीही लिहावे आणि कोणाच्याही नावावर खपवावे असे काहीतरी सतत चालू असते. कोणालाही आपणास आलेल्या पोस्ट ची सत्यता पडताळून पाहण्यात रस नसतो, मात्र आलेली पोस्ट तात्काळ पुढे पाठवण्यात धन्यता वाटते. आपल्या राष्ट्रगीताला जगात एक नंबर मिळाला, गोठवलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक फायदे या आणि अशा अनेक गोष्टी बिनदिक्कतपणे पुढे पाठवल्या जातात.  बऱ्याच लोकांना यामुळे मानसिक त्रास पण होतो, अगदी पाठवणाऱ्याला, ज्यांना पाठवले जाते त्यांना आणि ज्यांच्या नावावर ती पोस्ट खपवली जाते त्यांनाही.  मात्र अश्या प्रकारच्या पोस्ट पाठवणाऱ्या अतिहुशार समूहाला काय म्हणावे हेच समजत नाही. यांच्या बुद्धीची कीव करावी तितकी थोडीच आहे.  ...
अलीकडील पोस्ट

महाराष्ट्राची मधुशाला

महाराष्ट्राची 'मधुशाला' एक गोष्ट मला आधीच स्पष्ट करु द्या.  मद्यपान ही माणसाची गरज नाही.  अगदी सैबेरियातल्या उणे 30-40 अंशात जगणाऱ्या माणसाला व्होडका गरजेची नसते. तशी सहारा वाळवंट तुडवणाऱ्यालाही बियर उपयोगाची नसते.   मद्य हे अन्न नाही.  मद्यातून माणसाला कोणतंही (लौकिकार्थानं) जीवनसत्व, प्रथिनं, अन्नद्रव्यं मिळत नाहीत. मुळातच दारुत उंची वगैरे असा काहीच प्रकार असत नाही. "सिंगल माल्ट स्कॉच शिवाय कशालाही मी तोंड लावत नाही",अशी शेखी मिरवणारे उच्चभ्रू शहाणे आणि "पाच-पन्नास रुपयांची नारिंगी-मोसंबी ढोसणारे बिच्चारे," या दोन्हीतला गुणात्मक फरक शून्य.  अल्कोहोल नावाचं रसायन हे निव्वळ अल्कोहोल असतं...मग ते पन्नास वर्षं जुनं असो की पन्नास दिवसांपुर्वी बाटलीत भरलेलं. 'ट्वेन्टी इयर ओल्ड', 'व्हिंटेज वाईन' यासारखी सगळी थेरं म्हणजे ग्राहकाला भुलवण्यात प्रचंड प्रभावी आणि यशस्वी ठरेलली विक्री तंत्रं आहेत. मी स्वतः नैमित्तीक मद्यपान करत असलो तरी मद्यपानाचं समर्थन अजिबात करत नाही. 'मद्यपान प्रतिष्ठेचं असतं', 'मद्यपान आणि उच्च अभिरुची यांचा संबंध आहे...

how not to be wrong

*How not to be wrong* During World War II, numerous fighter planes were getting hit by anti-aircraft guns.  Air Force officers wanted to add some protective armor/shield to the planes. The question was "where"? The planes could only support few more kilos of weight. A group of mathematicians and engineers were called for a short consulting project.  Fighter planes returning from missions were analysed for bullet holes per square foot. They found 1.93 bullet holes/sq. foot near the tail of the planes whereas only 1.11 bullet holes/sq. foot close to the engine.   The Air Force officers thought that since the tail portion had the greatest density of bullets, that would be the logical location for putting an anti-bullet shield.  A mathematician named Abraham Wald said exactly the opposite; more protection is needed where the bullet holes aren't - that is -around the engines.   His judgement surprised everyone. He said We are counting the planes that returned from a...

सोशल मीडिया

सोशल मीडिया वर रोज येणाऱ्या संदेशाबद्दल काहीतरी लिहावं असं बरेच दिवसापासून वाटत होत, आज सुरुवात केलीय.  रोज सकाळी उठल्यावर मोबाईल घेतला की आपल्याही अगोदर ब्रम्ह मुहूर्तावर उठून शुभ संदेश पाठवणारे बरेच महात्मे आहेत याची प्रचिती येते. असो, शुभ सकाळ, शुभ ... वार, शुभ ... तिथी यासारखे संदेश आपल्या मोबाईल मधून ओसंडून वाहत असतात. असे असेल तरी हरकत नाही, परंतु बरेच महाभाग चित्र संदेश पाठवतात, म्हणजे आपल्याला आलेला चित्रमय शुभ संदेश दुसऱ्याला पाठवतात. हे म्हणजे आपल्याला मिळालेले ग्रीटिंग कार्ड नाव खोडून दुसऱ्याला त्याचे नाव टाकून पाठवण्यासारखेच आहे.  साधा शुभ सकाळ किंवा गूड मॉर्निंग असा लिहून संदेश पाठवणे म्हणजे बऱ्याच लोकांना मागासले पणाचे लक्षण वाटते. आपण एक उदाहरण घेऊ. समजा एका व्यक्तीला त्याच्या एका ग्रुप मध्ये 10 लोकांनी सचित्र शुभ संदेश पाठवला तर एका संदेशाची साईझ 50 kb असेल तर 10 संदेश म्हणजे 500 kb. असे 10 ग्रुप चे एकूण संदेश असा विचार केल्यास 5000 kb. म्हणजेच 5 mb इतका डाटा केवळ शुभ सकाळ संदेश वाचण्यासाठी खर्च होतो.  दिवसभर इतर संदेश येतात ते सोडले तरी परत शुभ रात्री चे ...
157 years ago, Victor Hugo finished his magnum opus, * "Les Miserables" *.  Victor Hugo passed away in Paris, on May 22, 1885 at the age of 83, when he was still fully in his faculties. His views, both moral and political, and his exceptional work, made him an emblematic character who was honored by the Third Republic with a state funeral, held on June 1 and attended by more than two million people, and with the burial of his remains in the Pantheon in Paris.  This poem that he never tires of reading and rereading millions of times he wrote forever ...  *I WISH YOU*  I wish you first that you love, and that by loving, you are also loved.  And that, if not, be brief in forgetting and that after forgetting, do not hold grudges.  I wish, then, that it is not so, but that if it is, you know how to be without despairing.  I also wish you have friends, and that, even bad and inconsistent  Be brave and faithful, and let there be at least one you can tru...

कुवत

*ज्याची जेवढी कुवत, तेवढा त्याचा विचार....* आमच्याकडे त्यावेळी मारुती 800 ही गाडी होती. बहिणीच्या गावाहून येताना गाडीला खालून दगड लागला. ऑईलचेंबर फुटला आणि ऑइल गळायला लागलं. मी तशीच गाडी दामटली. घरी आलो आणि गाडी बंद पडली.         दुसऱ्या दिवशी सकाळी मी मेस्त्रीला बोलावलं. त्यानं इंजिन चेक केलं आणि विचारलं,"ऑइल गळल्यावरही गाडी पळवलीय काय?" "होय. पाच सहा किलोमीटरच." मी म्हटलं. "गाडीचं इंजिन जाम झालंय... इंजिनचं काम करावं लागेल." "अहो, नवीन गाडी आहे आणि एवढ्यात इंजिनचं काम?" "ऑइल नसताना गाडी पळवल्याचा परिणाम. इंजिन खोलावंच लागेल." "ठीक आहे. इथंच काम होईल की गाडी मिरजला घेऊन जावी लागेल?" "मिरजलाच घेऊन जावी लागेल."          त्यांनी मग माझी गाडी एका टेंपोला बांधून ओढून नेली. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी एक पुढारी माझ्या दारात. *"डॉक्टर, गाडी बँकेनं ओढून नेली होय?"* त्यानं विचारलं. "कोण म्हटलं?"  "नाही, गावात कोणतरी म्हणत होतं." तासाभरात दुसरा मनुष्य. *"डॉक्टर, किती हप्ते तटले होते हो?...हप्त...

VRS

स्वेच्छा निवृत्ति   ३१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर जेव्हा प्रथमतः स्वेच्छा निवृत्ति घेण्याचा विचार मनात घोळू लागला, मी त्या दिशेने विचार करण्यास सुरुवात केली आणि जो कोणी माझा विचार ऐकेल तो एकच प्रश्न विचारु लागला घरी बसून काय करणार ? साहजिकच मी यावर बरेच विचार मंथन केले त्यामधे मला असे  लक्षात आले कि जोवर पैसे मिळत आहेत तोपर्यंत कमवत राहावे अशी मानसिकता जवळ जवळ ९५% लोकांची आहे. बरेच लोक अगदी आजारी किंवा तब्येत खालावलेल्या स्थितीतहि नौकरी करत असतात. खरेच माणसाला जगण्यासाठी असा कितीसा पैसा लागतो? खरे पाहता सध्याची चौकोनी कुटुंबे महिन्याकाठी किराना, दूध, आणि इतर सर्व खर्च लक्षात घेता फ़ारतर २० हजार रुपयात आपले कुटुंब चालवतात. मग विनाकारण अति च्या मांगे लागून अवाढव्य खर्च वाढवून आपले स्वास्थ्य स्वताच्या  हाताने आणि हट्टाने बिघडवून घेतात.  राहण्यासाठी एक घर , आणि आपुलकी असलेले कुटुंबातील सदस्य ह्यावर न थांबत अंतर्गत सजावट, रंगकाम, गाडी अणि फार्म हाउस किंवा सेकंड होम वगैरे गोष्टी केवळ इतरांच्या तुलनेसाठी करत असतात. ह्या सर्व गोष्टींसाठी घरमालक पैसे कमावण्...